दर तीन वर्षांनी सुमारे ३० दशलक्ष हिंदू भाविक कुंभमेळ्यात आपली पापं धुवून टाकण्यासाठी जमतात. हा जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे. छोट्या गावांत आणि शहरांत उतरणाऱ्या या प्रचंड मोठ्या जमावामुळे चेंगराचेंगरी होणं अटळ असतं. २००३ साली या मेळाव्यात ३९ माणसं दगावली. २०१४ मध्ये, १५ वर्षांच्या निलय कुलकर्णीने आपलं स्वतःच शिकलेलं प्रोग्रॅमिंगचं कौशल्य वापरून, चेंगराचेंगरी थांबवण्यासाठी एक उपाय शोधायचं ठरवलं. त्याच्या संशोधनाबद्दल जास्त माहिती या भाषणात ऐका. आणि २०१५ चा कुंभमेळा चेंगराचेंगरीशिवाय, मनुष्यहानीशिवाय पार पाडण्यात या संशोधनाची कशी मदत झाली, ते पहा.

