तुमच्या पूर्वजांना कोणते अन्न आवडत होते?
शेतीचे औद्योगिकीकरण आणि आदर्श आहाराच्या बदलत्या, पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव असणाऱ्या कल्पनांमुळे जगभरात आदिम अन्न संस्कृती नष्ट होत आहेत.
एकेकाळी अत्यावश्यक असणाऱ्या स्वयंपाकाच्या परंपरा लोकांच्या जीवनातून, आठवणींतून अचानक नाहीशा का होताहेत याचा वेध घेतला आहे, अन्न संशोधक अपर्णा पल्लवी यांनी. आपल्या अन्नाशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी त्यांनी एक मार्मिक उत्तर सुचवले आहे.

